विविध मागण्यांसह युवा संघर्ष पद यात्रा आज नागपुरात पोहोचणार.. — पुणे ते नागपूर असा आठशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असेल. — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चात सहभागी होणार..

दामोधर रामटेके/संजय टेंभुर्णे

        कार्यकारी संपादक

             महाराष्ट्र राज्यातील युवकांनी महत्वपूर्ण अशा विविध मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २४ आक्टोंबरला पुण्यावरून पदयात्रा काढली होती.

            सदर पदयात्रा आठशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज नागपूर येथे पोहोचणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा युवा संघर्ष पद यात्रेचे नागपूरात आगमन झाल्यावर स्वागत करण्यात येणार आहे.

              अत्यंत महत्त्वाच्या मागण्या अंतर्गत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पदयात्रा युवकांतर्फे काढण्यात आली.या यात्रेचा समारोप आज नागपूरात होणार आहे.

            युवकांची संघर्ष पद यात्रा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या न्याय मागण्या शासन दरबारात पोहोचविण्यासाठी अधिवेशन परिसरात धडकणार आहे.

   *** 

 प्रमुख मागण्या..

१) शासकीय पदभरती व रोजगार कंत्राटी नोकरभरती रद्द करणे.

२) २ लाख ५० हजार रिक्त पदांची भरती करणे.

३) अवाजवी परीक्षा शुल्काच्या माध्यमातून होणारी वसुली थांबविणे तसेच यापूर्वी वसूल केलेले अतिरिक्त परीक्षा शुल्क परत करणे.

४) पेपरफुटी विरोधात कडक कायदा करणे तसेच नोकर भरतीत होणारा भष्टाचार रोखणे.

५) रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात.

६) शिक्षक व प्राध्यापकांसह इतर सर्व विभागातील रिक्त पदे भरणे.

***

सर्व भरती प्रकीया MPSC मार्फत करणे.

१) औद्योगिक विकास व गुंतवणूक..

२) राज्यातल्या युवा वर्गाला खाजगी क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात.यासाठी गुंतवणूक धोरण राबविणे.नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणे.

३) छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती यासारख्या Two Tier शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञाना (IT) क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आणणे.

४) तालुका स्तरावर MIDC ची स्थापना करणे आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC चे सक्षमीकरण करणे..

५) MSME क्षेत्राचे बळकटीकरण तसेच उद्योजकता वाढीस चालना देणे.

***

कृषी संबंधित मागण्या..

१) खतांच्या लिकिंगला बंदी घालून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा निवडीचे स्वातंत्र्य देण्यात यावे.

२) दुबार पेरणी करूनही अपुऱ्या पावसामुळे यंदा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.त्यामुळे शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत यावी.

३) दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फी माफीसह इतर सवलती लागू कराव्यात,पीक विम्याची अग्रिम भरपाई द्यावी.

४) प्रयोगशील युवा शेतक-यांसाठी विशेष योजना राबविणे.

५) आत्महत्या रोखण्यासाठी केवळ कागदी कार्यक्रम न आखता आत्महत्यांचे मूळ शोधून आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविणे.

***

शिक्षण व कौशल्य विकास..

१) शाळा दत्तक योजना रद करणे.

२) समुह शाळा योजना रद्द करणे.

३) सारथी,बार्टी,महाज्योती व TRTI संस्थाचे सक्षमीकरण करून या संस्थांना प्रत्येकी १ हजार कोटींची तरतूद करणे.

४) TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे.

५) नोकरदार महिला व विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अद्यावत वसतिगृहे बांधणे.

६) असंघटीत क्षेत्रातील युवकांसाठी Reskilling, Up skilling कार्यक्रम राबविणे.

७) बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफ करणे.

८) विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रभावी योजना आखणे.

९) शिक्षकांवर शैक्षणिक व्यतिरिक्त इतर कामांचा भार टाकू नये.

**

कायदा-सुव्यवस्था व आरोग्य..

१) महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा करणे.

२) महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना राबविणे.

३) ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवणे.

४) सर्वांना पुरेशा आरोग्य सुविधा देणे.

***

 सामाजिक व क्रीडा..

१) मराठा आरक्षण,धनगर आरक्षण,लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना करणे.

२) युवा आयोगाची स्थापना करणे.

३) क्रीडा विभागाचे सक्षमीकरण करणे व होतकरू खेळाडूंना संधी देणे.

            महाराष्ट्राला पुन्हा समृद्धीच्या शिखरावर नेण्यासाठी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच्या युवा संघर्ष यात्रेचा आज समारोप होणार आहे.