उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
नैसर्गिक आपत्तीपुढे कुणाचे काही चालत नाही हे अनेकदा सिद्ध झाले.आतातर निसर्ग असा कोपला आहे की शेतात काम करणाऱ्या महिला – पुरुषांनाही सोडत नाही..
काल असाच दुर्दैवी घटनाक्रम चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव (महाराष्ट्र राज्य/भारत देश) येथे घडला असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर विज पडली व तो जागीच मृत्यू पावला.
शेतकऱ्यांचे नाव दिलीप गुलाब श्रिरामे असून त्यांचे मृत्यू समयीचे वय ३५ वय आहे.तो रात्र होऊन सुद्धा घरी न आल्याने त्याची शेतात जाऊन नातेवाईकांनी शोधाशोध केली असता,तो विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
सदर घटनेची माहिती महसूल विभाग चिमूर व पोलीस स्टेशन भिसी यांना देण्यात आली होती.सदर विभागाचे संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी मोका स्थळावर पोहचले व घटनेचा पंचनामा केला.
यानंतर दिलीप गुलाब श्रिरामे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा उप रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला.
दिलीप च्या नैसर्गिक मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


