Home देशविदेश गेल्या 75 वर्षात, जेंव्हा जेंव्हा RSS पुरस्कृत जनसंघ / भाजप सत्तेत आली,...

गेल्या 75 वर्षात, जेंव्हा जेंव्हा RSS पुरस्कृत जनसंघ / भाजप सत्तेत आली, तेंव्हा तेंव्हा जगात भारताचे सार्वभौमत्व आणि प्रतिमा कलंकित झाली……! — लेखाचा भाग = 06 ( सहा )

          1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा 13 दिवसाचे, त्यानंतर 13 महिन्याचे, शेवटी पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण केला. म्हणजे 1998 ते मे 2004 पर्यंत ते भारताचे सर्वात जास्त काळ (तोपर्यंत ) बिगर काँग्रेसी भाजपाचे भारतीय प्रधानमंत्री होते. 

          यांच्याच कार्यकाळात भारताने दूसऱ्यांदा पोखरणच्या वाळवंटात यशस्वी अणूचाचणी केली. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्यानंतर भारत अन्वस्त्रसज्ज देश बनला. यानंतरच पुढे पाकिस्तानने यशस्वी अनुचाचणी केली. म्हणजे आपल्यानंतर 1975 नंतर अणुबॉम्ब बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला यश आले ते आपल्या दोन अणूचाचण्या झाल्यानंतरच.

         परंतू , तरीसुद्धा पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा दोनच अणुबॉम्ब कमी आहेत. भारताकडे 172 आणि पाकिस्तानकडे 170 आहेत. 

          मा. वाजपेयी यांच्याच कार्यकाळात कारगिल युद्ध झाले. आमच्या गुप्तहेर संघटनेचे ते अपयश होय. ज्याची किंमत सुमारे अडीचशे जवान आमचे शहीद झाले. बॉर्डरजवळ असलेल्या भारतीय हद्दीतील एका गावातील शेतकरी जेंव्हा आपला हरवलेला ‘ याक ‘( बैल ) शोधण्यासाठी उंच डोंगरावर जातो, ते शोधत असताना त्याच्या नजरेस कांही पाकिस्तानी सैनिक पडतात. तो घाबरतच खाली येऊन आपल्या सैनिकांना कळवतो. तिथून पुढे आपल्या हालचाली सुरु होतात. सुमारे 5000 पाकिस्तानी सैनिक शस्त्रात्रासह हजारो फूट उंचीवर जाऊन बसेपर्यंत आमची गुप्तहेर संस्था आणि सैन्य काय करत होते? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 

          जेंव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. तेंव्हा अडचण ही होती की वरून उंच माथ्यावरून खालच्या सैनिकांवर हल्ला करणे सोपे असते, परंतू , खालून प्रतिकार करणे अवघड असते. म्हणून हे युद्धाचा निकाल लागण्यास उशिर लागला. शेवटी मे ते जूलै 1999 मध्ये 85 दिवसानंतर कुठे हे युद्ध मोठी किंमत देऊन जिंकले. 

         थोडक्यात सारांश असा की भाजपच्या या कार्यकाळातच गुप्तहेर संघटनेच्या अपयशामुळे आणि भारतीय सैन्याच्या हलगर्जीपणामुळे पाकिस्तानची मुजोरी वाढली आणि एकीकडे वाजपेयी पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी पाकिस्तानात असताना, दुसरीकडे कारगिल युद्ध लादून पाकिस्तान भारताच्या पाठीत खंजीर खूपसत होता. हे आमच्या भाजपच्या राज्यकर्त्यांच्या मुत्सदेगिरीचे अपयश नव्हे काय…..?

        त्यांनंतर मा. वाजपेयी यांच्याच कार्यकाळात अर्थात बिगरकाँग्रेसी सरकारच्या काळातच IC-814 या भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण पाकिस्तानी दहशतवाद्यानी केले. त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य कराव्या लागल्या. हजारो अमेरिकन डॉलर्स दिले आणि खतरनाक दहशतवाद्याना सोडून देऊन विमानातील प्रवाशांना मुक्त करावे लागले.

          परंतू , 1976 मध्ये छोट्याशा इस्राएल देशाचे विमान जेंव्हा पॅलिस्टिनी अतिरेक्यानी अपहरण करून युगांडात नेले. तिथे 104 इस्राएली नागरिकांना बंधक बनवले. त्यांचीही मागणी हीच होती की इस्राएलने आमचे 54 अतिरेकी सोडावेत आणि पाच लाख अमेरिकन डॉलर्स द्यावेत. इस्राएलने मुत्सदेगिरीच्या बळावर *ऑपरेशन थंडरबोल्ट* राबवले. यात त्यांनी चार विमाने पाठवून युगांडाच्या रडारला सुद्धा पत्ता न लागू देता, बंधक केलेल्या ठिकाणावरून सुखरूपणे आपल्या नागरिकांना सोडवून आणतात. सर्व अपहरणकर्त्यां अतिरेक्यांचा खात्मा करतात. उलट यूगांडाचे चार विमाने सुद्धा बॉम्ब टाकून उडवून देतात. आणि *ऑपरेशन थंडरबोल्ट* यशस्वी करतात तेही स्वतःच्या देशापासून 4000 मैल दूर असलेल्या युगांडा देशात……..!

   आणि इथे तर आमचे विमान आमच्या देशाची सीमा असलेल्या अफगाणिस्तान देशातील विमानातील नागरिकांना सोडवण्यासाठी अतिरेक्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागतात. 

    इथेच भाजप सरकारच्या मुत्सदेगिरीचे अपयश आहे……

   सरकारला विमानातील नागरिकांच्या जीवाची एवढी काळजी आहे…….

    परंतू , कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या जगाच्या पोशिंद्याची अजिबात काळजी नाही…….!

    पुन्हा याच सोडलेल्या अतिरेक्याने आमच्या संसदेवर याच भाजपच्या कार्यकाळात 2001 मध्ये संसदेवर हल्ला केला……!

  इथेही आमची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मुत्सदेगिरी अपयशी ठरली. 

    म्हणजे आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा केंद्रात भाजप सत्तेत आले. तेंव्हा तेंव्हा भाजपाचा राष्ट्रवाद RSS च्या मनुस्मृतीकडे झुकते माप देणारा ठरला. म्हणून पाकिस्तानची मुजोरी वाढत गेली. हे सत्य नाकारता येत नाही.

   म्हणून RSS / मोहन भागवत / भाजप / मोदी / फडणवीस / आणि यांचे मित्रपक्ष बनून हतबलतेने सत्तेत सहभागी झालेले…….

     हेच खरे देशाचे दुश्मन आहेत…….!

   टीप :- या लेखाचा पुढील भाग उद्याच्या सातव्या भागात.

आवाहनकर्ता आणि संविधान जागृतीचा कृतिशील लेखक…

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689