सत्ता हे साध्य नव्हे तर साधन आहे,ते संपती धन गोळा करण्याचे किंवा प्रतिष्ठेचे साधन नसून परिस्थिती बदलण्याचे,परिवर्तनाचे,भौतिक समृद्धी निर्माण करण्याचे साधन आहे.
परंतु प्रतिष्ठेसाठी धन,संपती आणि संपती संरक्षणासाठी सत्ता असे समीकरण हल्ली झालेले दिसते.
अहंकारातून प्रतिष्ठा जन्मास येते.याचा अर्थ मुळात अहंकार,अहंकारातून प्रतिष्ठा,प्रतिष्ठेसाठी धन संपती,संपत्तीसाठी सत्ता अशी साखळी तयार होते,किंवा असा क्रम लागतो,आणि या नादात माणूस सत्तेचा गुलाम बनण्यास पण तय्यार असतो.गुलामीचे सुख त्यास आनंद देत असते.
ज्याला गुलामी म्हणजे काय? आणि सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य म्हणजे काय?,पिंजऱ्यातला खाऊन पिऊन सुखी असलेला पोपट आणि मोकळ्या आकाशात भरारी घेणारा पोपट यातील फरक कळत नाही,त्यांना अज्ञानीच म्हटले पाहिजे.
मग ते कितीही शिकलेले असले किंवा किती श्रीमंत असले तरी शेवटी ते अडाणी अज्ञानीच होत,की जे सत्तेचे गुलाम होऊन मिरवीत असतात.
गरिबीचे अस्पृश्य,अस्पृश्यतेचे,जातीयत्तेचे,धर्मांधतेचे चटके खाऊनही त्यात त्यांना परिवर्तन घडवावे असे वाटत नाही,कारण ते सत्तेचे गुलाम असतात.
गुलामाला स्वतःचे मत नसते.त्यांना मालक असतो,मालकाचा शब्द शिर सावंद्य मानणे एव्हढेच त्यांना माहीत असते.मालकप्रतीची श्रद्धा दृढ असते.नव्हे ते अंधभक्त,अंधश्रद्धाळू असतात.
गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही,हे जरी खरे असले तरी सत्तेचे गुलाम नव्हे सत्ता उपभोगत असलेले गुलाम म्हणजे सत्तेचे सेवक नोकर असतात,यांना आपण गुलाम आहोत याची जाणीव असते,तरी हे सत्तेची सेवा करण्यात धन्यता मानतात.
— कारण हे नुसते गुलाम नसून सत्तेचा जो मालक असतो,त्याची हे रखेल असतात…..
यांना मान आणि मन नसते,इज्जत,स्वाभिमान,दर्जा म्हणजे काय ? हे माहीत नसते.एव्हढे खालच्या पातळीचे हे लोक असतात.
सत्तेचे गुलाम,म्हणजे मंत्री संत्री,आमदार खासदार जे सत्तेचे लोभी आहेत,वेळप्रसंगी सत्ता त्याग करायला तयार नसतात,आपली संपतीला धक्का लागू नये,जेल भोगू नये म्हणून सत्तेचे गुलाम बनून राहतात.
सत्तेच्या मालकाचे हे दास,यांचे कडून परिवर्तनाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.असे दास स्वतः गुलाम राहतात आणि जनतेला पण गुलामीत ठेवतात.कारण यांना सार्वभौमत्व,स्वाभिमान,स्वावलंबन,दर्जा,प्रतिष्ठा,स्वातंत्र्य यांचेशी काहीच देणे घेणे नसते.
एखाद्या वेश्येचे जीवन जगण्यास हे लोक तयार असतात.केवळ भौतिक सुखापायी.यांना ना मान पान, दर्जाची गरज.तुपासाठी उष्टे खाणारी आणि मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक असतात,हे गद्दार आणि खालच्या पातळीचे असतात.
यांना ना पक्षनिष्ठा,ना ध्येयनिष्ठा,ना देशनिष्ठा,ना परिवर्तन,ना क्रांती.यापैकी कशातच हे बसत नाहीत.कारण हे सत्तेच्या मालकाचे गुलाम असतात.
मालक सत्तेला गुलाम करतो,आणि सत्ताही लोकप्रतिनिधींना गुलाम करते,याचे कारण सत्ता हे साध्य नसून परिवर्तनाचे साधन आहे किंवा विकासाचे साधन आहे हे अजूनही यांना कळलेले नसते किंवा कळूनही हे आपले दास्यत्व आणि दहस्यत्व सोडायला तयार नसतात.


