Home देशविदेश वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…….. — भाग = 005…

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…….. — भाग = 005…

    “शेवटी देहदंडाची शिक्षा देण्याचा तो दिवस अगदी काही दिवसावर आला. तोपर्यंत सॉक्रेटीसचे असंख्य चाहते, मित्र, नातेवाईक यांनी दररोज गर्दी करून अंतिम भेट घेण्यासाठी गर्दी करत होते. त्यात त्यांचे अगदी जवळचे मित्र क्रेटो, शिष्य प्लेटो, फिडो, इत्यादी मंडळी त्यांच्या जवळून हालत नव्हती. या सर्वाना प्लेटो अगदी अंतिम दिवस येईपर्यंत केवळ आणि केवळ…

        समाज,समाजव्यवस्था, लोकशाही,स्वातंत्र्य,समता आणि समानता यातील मूलभूत फरक,न्याय ,निसर्गाचे विविध अंग,या सर्व संकल्पना पूर्वी ग्रीकमध्ये कशा अविष्कारीत होत्या,त्या कशा सोफेस्टांनी नष्ट केल्या. या विषयी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत संवाद साधत समाज जागृती ते करत होते…

       शेवटी तो देहदंडाचा (आत्महत्येचा दिवस,कारण देहदंडाची जेंव्हा त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. त्याच दिवशी त्यांना अंतिम ईच्छा विचारण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती की, त्या दिवसापर्यंत मी जनतेला विशेषतः तरुणांना जागृत करताना कुणीही मला अडवू नये आणि मी माझ्या हातानी विष प्राशन करून आत्महत्या करेन. ही त्यांची अंतिम ईच्छा मान्य करण्यात आली होती ) उगवला. सकाळपासूनच दिवसभर त्यांच्या शेजारी असंख्य चाहत्यांची अफाट गर्दी जमलेली होती.

       या दिवशी मात्र निरव शांतता होती.प्रत्येकजण मौन धारण करून मनोमन आक्रोश करत होता. सॉक्रेटीसच्या चेहऱ्यावर मात्र कसलीही भीती किंवा नाराजी जाणवत नव्हती. उलट ते इतरांना रडू नये म्हणून धीर देत होते.आणि आपण स्वतःजीवनभर ज्या तत्वासाठी जगलो,त्यांची ते आठवण करून देत असत. आणि तसे समाजाने वागावे यासाठी अगदी मृत्यूच्या दारापर्यंत असताना सुद्धा समाज जागृती करीत होते…

    अगदी शेवटचे काही तास उरले असताना ज्याच्यावर जबाबदारी विष बणवण्याची जबाबदारी दिली होती तो आला आणि सॉक्रेटिसला विचारलं की , तुम्ही आवाज द्या विष तयार आहे. त्याचबरोबर त्याने हेही सांगितलं की, ” सॉक्रेटीस, जेंव्हा विष प्राशन करशील तेंव्हा पहिल्या दहा मिनिटात कंबरेपासून पाय निस्तेज होतील म्हणजे पायांना कसल्याही संवेदना जाणवणार नाहीत. त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात गळ्यापासूचा खालचा भाग निस्तेज होईल. शेवटच्या दहा मिनिटात मृत्यू होईल. ” असे सांगून तो निघून गेला.

     “हँम्ब्लॉक” नावाचे विष बनवण्यात आले.अनेक वनस्पतीचा पाला आणि मुळे एकत्र करून वाटून द्रव्य केले जाते. त्या प्राशनामुळे मरणाऱ्याला मरताना कोणताही त्रास होत नाही. म्हणजे शुद्ध हरपून त्या बेशुद्धीतच मृत्यू येतो. असे हे विष बनवले गेले.

       शेवटी ती वेळ आली आणि त्या विष बनवणाऱ्याला सॉक्रेटिसने आवाज देऊन विष आणायला सांगितलं, विष आल्यानंतर लगेच त्यांनी ते प्राशन करून अंगावर चादर ओढून झोपले..

     अवघ्या पाच मिनिटाच्या आत त्यानी तोंडावरची चादर काढली आणि क्रेटोला आवाज दिला आणि सांगितलं की, “अरे क्रेटो, मी माझ्या शेजाऱ्याची उधार कोंबडी आणून खाल्ली होती. तेवढे त्याचे माझ्यावरील कर्ज देऊन टाक.” त्यावर क्रेटोने गहिवरतच उत्तर दिले,” तुम्ही आता शांत झोपा……

      ती कोंबडी किंवा पैसे मी त्या शेजाऱ्याला देईन असे म्हणून शांत आणि शांत कायमच्या निद्रेत सॉक्रेटीस या जगाला सोडून अवघ्या अर्ध्या तासात निघून गेले.

     सॉक्रेटीस हे या बाहेरून आलेल्या आर्याच्या अर्थात सोफिस्टांच्या साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनितीचे विश्वाचे कदाचित पहिले बळी ठरले!

(या लेखाचा उर्वरित भाग उद्याच्या भागात…..)

  जागृतीचा कृतिशील लेखक..

    अनंत केरबाजी भवरे..

   संविधान विश्लेषक, रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…