उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या एका माणसामुळे देश धोक्यात आला आहे आणि माणसाचे अस्तित्व खतऱ्यात आले आहे.यामुळे भारत देशातील समस्त महिला पुरुषांनी भाजपा सरकारपासून तत्काळ सतर्क व्हा आणि आताच उपाययोजना आखा,असे आवाहन पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केले आहे.
भारत देशातील जनतेला आवाहन करताना दिपक केदार म्हणाले,आता आपल्या अस्तित्वाचा लढा स्वतःलाच लढावा लागणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सगळे कांड बाहेर आले म्हणून लोकडाऊन चे भूत उभे राहिले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेली लॉकडाउनची घोषणा म्हणजे हुकूमशाही आहे.जनतेला बोलू नका,रस्त्यावर येऊ नका,RSS BJP ला टार्गेट करू नका हिच धमकी यामागे दिसते आहे असेही दिपक केदार म्हणाले.
कुणी काहीही बोलले,पण वास्तव हेच आहे की जागतिक संकटाच्या नावाखाली खूप काही घडणार आहे.खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलं संकट आणि लॉकडाउन…



