महेशदादा सारखा पैलवान लोकसभेत पाहिला आवडेल.:- राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील… — मोदी@9 महाजनसंपर्क अभियानामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महेशदादा सारखा पैलवान लोकसभेत पाहिजे तसेच लोकसभेत अर्थसंकल्प पाहताना मला माझ्या शेजारी महेशदादाला बसायला पाह्यला आवडेल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आळंदी येथे बोलताना सांगितले. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला असल्याचे यावेळी दिसून आले.

     जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोदी@9 महाजनसंपर्क अभियानामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे’, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केले. आळंदी येथील फ्रुटवाला धर्मशाळा येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते. 

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे देशभर मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, प्रदिप कंद, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, आशा बुचके, जयश्री पलांडे, विकास डोळस, संजय घुंडरे, वैजयंता कांबळे, शांताराम भोसले, प्रिया पवार, कोमल काळभोर-शिंदे, माऊली बनसोडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

      यावेळी रावसाहेब दानवे पा. म्हणाले, ‘मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेली विकासकामे आणि यशस्वीरीत्या राबवलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याचीच परिणती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. 

      यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर देशातील बदललेली परिस्थिती नव मतदारांना आकर्षित करत आहे. देशात कमी झालेला भ्रष्टाचार, निर्माण झालेल्या विविध संधी आणि जगभर देशाची उंचावलेली प्रतिमा यामुळे तरुण वर्गातही भाजपची क्रेझ वाढत आहे.’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी, सुत्रसंचलन महेंद्र खंडारे तर आभारप्रदर्शन माजी नगराध्यक्षा वैजयंता कांबळे यांनी केले.