ब्रेकिंग न्युज… शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या…

 

रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

            चिमूर तालुक्यातील मौजा बेलारा येथील एका शाळाकरी मुलाने स्वतःच्या घरी नायलन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.आत्महत्या करणाऱ्या शाळकरी मुलाचे नाव कुमार करण मारोती गुरनुले (वय १५ वर्ष) असे आहे. 

             कुमार करण हा बेलारा येथुन तीन की.मी.अंतरावर असलेल्या,”जय मानव-जय लहरी विद्यालय,मदनापूर येथे नवव्या वर्गात शिकत होता.तो मागील चार पाच दिवसांपासून प्रकुर्ती बरी नसल्याच्या कारणावरून शाळेत गैरहजर होता. 

            करणला वडील नव्हते.त्याच्या पश्चात आई व एक १९ वर्षीय मोठा भाऊ विवेक आहे.घटनेच्या दिवशी मोठा भाऊ विवेक व आई जंगलात मजुरीला गेले होते.चार वाजता घरी परत आले असता घराचे दार आतमधून बंद होते. 

          आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दाराच्या फटीतून बघितले असता करण पांढरी शर्ट व भगवा फुलपांट असलेल्या शाळेच्या गणवेशात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला आणि आई व भावाला धक्काच बसला.

         घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आणण्यात आले.

           मंगळवारी गावातील शाळकरी मुलासोबत करण काही अंतरावर शाळेत जाण्यास निघाला होता.मात्र,सहकारी मुलांना पुढे जाण्यास सांगुन करण घरी गेला असल्याची माहिती आहे.कुमार करणच्या आत्महत्तेचे कारण कळु शकले नाही. 

             पुढील तपास ठाणेदार गभणे यांचे मार्गदर्शनात psi भीष्मराज सोरते करीत आहेत.दरम्यान शाळेचे शिक्षक भास्कर बावनकर यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत सहकार्य केले.