डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे हिंदूकोडबिल भारतिय महिलांचा आत्मसन्मान होय :- समतादूत प्रज्ञा राजुरवाडे..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

      8 मार्च हा जागतिक महिला दिन महीलांचा सन्मान दिवस जगातील महिलांनी आपल्या न्याय अधिकारासाठी मतदानाचा अधिकार,कामाचे तास कमी असावेत यासाठी आंदोलन केलीत.पण भारतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिन्दु कोडबिल या कायद्याच्या माध्यमातुन समान मताधिकार दिला.

       भारतीय सविधानात असलेल्या हिन्दुकोडबिल कायद्याच्या उपयोग महिलानी आपल्या जीवनात करुन घेतला आहे व प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती केली.

       स्त्री आत्मनिर्भर,सक्षम आत्मविश्वासपूर्ण ,वैचरिक मुक्त आहे.हा जिवनजगण्याचा आत्मसन्मान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हिन्दु कोड बिलानी भारतिय महिलांना मिळाला असल्याचे प्रतीपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी चिमुर महिला कांग्रेस कमिटीच्या मेळाव्या प्रसंगी केले.

      जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व नारी न्याय संमेलन,महिला राजकिय नेतृत्व सक्षमीकरण आयोजित कार्यक्रमात प्रज्ञा राजुरवाडे ह्या प्रमुख अतिथी होत्या.

      या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेश कमिटीचे महासचिव डॉ.अविनाशभाउऊ वारजुरकर होते.कर्यक्रमाच्या अध्यक्षा चंद्रपुर जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर,प्रमुख मार्गदर्शक प्रज्ञा राजुरवाडे,आधिवक्ता सिमा साखरकर,अनिताताई वारजुरकर,माजी जिल्हाध्यक्ष लताताई अगडे,माजी सभापती शोभाताई पिसे,सिमाताई बुटके,भावनाताई पिसे,लताताई पिसे,आदी उपस्थित होते.

       पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महीलाच्या न्यायासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

       महिलांना विचार मांडण्याचे,बोलण्याचे,लिहण्याचे स्वंत्र्य दिले आहे.आज राजकीय क्षेत्रात आपण मोठ्या प्रमाणात आहात.राजकिय सक्षम नेतृत्व महिलानी कसे तयार करायला हवे.कुठल्याही पक्षातील महिला अशोत, राजकारणात आपन भारतीय संविधानाचे मुल्य अधिकार जनतेला न्याय मिळवून देन्यासाठी येतो की सत्ता उपभोगासाठी येतो हा चिंतनीय प्रश्न होत चालला आहे.

       त्यामुळे महिला सक्षम करण्यासाठी,समाज सुधारण्यासाठी राजकिय भूमिका महत्वाची आहे.तेव्हा राजकीय नेतृत्व करत असताना सर्व महिलानी आपले संघटन कौशल्य वाढवावे,पक्षाची बांधनी करत असताना पदाची अपेक्षा करु नये, तळागाळातिल महिला मजुर यांचे प्रश्न-समस्या माहिती करुन भारतीय सविधानाचा प्रचार करावा.

      महीला महिलाची विरोधक न होता महिलावर होणाऱ्या अत्याचारावर ,अन्यायावर बोलावे,राजकिय पक्षामुळे किवा आरक्षणामुळे आपन निवडुन येतो,पण फार कमी अशा रजिकय नेतृत्ववाण महिला समाजाच्या समस्यावर बोलताना आढळतात ही देशातील सक्षम महीलासाठी शोकांनतिका आहे. अश्यामुळे भारतिय सविधानाला आपण न्याय नाही देवू शकत, अपरिपक्व नेतृत्व ही देशाची व समाजाची भुल करणारे नसावे,महिला धोरणांमध्ये महिलावर होनारे अत्याचार, कुपोषण,शिक्षण,कौटुंबिक हिंसाचार यासाठी आधार देवून आपली भूमिकापार पाडायला हवी असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यानी यावेळी केले.

     या कार्यक्रमाचे संचालन भावनाताई बावंनकर, प्रास्ताविक माधुरी रेवतकर,आभार गितांजली थुटे यानी केले. यावेळी चिमुर तालुक्यातिल सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपच, ग्रामपंचायत सदस्य आदी सर्व महिला उपस्थित होत्या.