तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी मी विचारलेल्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, किती मुस्लिम युवकांना आपण नोकऱ्या दिल्या :- हर्षवर्धन पाटील…  – विकासाच्या पोकळ गप्पा मारणे सोडून द्यावे,आपल्या भावनिकतेला लोक आता बळी पडणार नाहीत…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

– इंदापूर तालुक्याच्या आजपर्यंतच्या वैभवशाली परंपरेत सर्वधर्मसमभावाची आणि विकासाची गंगा सर्व कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे आपण कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य केले विरोधक केवळ भाषण आणि भावनिक साद घालण्यात तरबेज

     तालुक्याचे लोकप्रतिनिधी प्रत्येक भाषणामध्ये आपण तालुक्याचा कसा विकास केला तसेच किती लोकांच्या विकासाकरिता प्रयत्न केला. यासाठी भावनेत त्याला हात घालून ते प्रत्येक भाषणामध्ये आपले मत व्यक्त करीत आहेत मात्र त्यांना माझा साधा प्रश्न आहे. की गेल्या दहा वर्षांमध्ये किती मुस्लिम युवकांना आपण रोजगार दिला हे त्यांनी सांगावे कारण लोक आज तुमच्या सततच्या भावनिक केला कंटाळून गेले.

            असून आपण केवळ विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहात मात्र लोकांपर्यंत हा विकास पोहोचला नसल्याने तालुका लोकप्रतिनिधींनी मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या टीकेच्या प्रश्नाला उत्तर दिले.

             हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ आता योग्य वेळ आली असून जनताच आपल्या पोकळ विकासाच्या गप्पांना प्रत्युत्तर देणार आहे. तालुक्यामध्ये एकही नवीन शैक्षणिक संस्था किंवा तुकडी किंवा उद्योग व्यवसायाची उभारणी झाली नाही.

          विकासासाठी भरीव योजना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी एकही प्रयत्न यशस्वी ठरला नाही उलट जनतेचे प्रश्न आणि समस्या वाढवण्यात आपण मोठी कामगिरी केली आहे. असे असताना केवळ जनतेला भावनिक होऊन विकासाचे नवनवीन स्वप्न आपण दाखवत आहात जनता आपणास योग्य प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.लोकप्रतिनिधींनी मी विचारलेल्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.