डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय स्त्रीला कायदेशिररित्या सक्षम केले :- समतादूत प्रज्ञा राजुरवाडे..

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी

               १९२७ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूस्मृर्ती ह्या ग्रंथाचे दहन करुन समस्त भारतीय स्त्रीच्या संरक्षणासाठी,”हिंदू कोड बिल,हा कायदा केला व स्त्रीनामुक्त केले.

           आजची स्त्री सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे,भारतिय सविधानाने स्त्री-पुरुष ही विषमता नष्ठ करुन कलम 12 ते कलम 19 पर्यंत स्त्रीयांना पुरुषाबरोबर सर्व अधिकार बहाल केले व कलम 13 नुसार मनूस्मृर्तीला अवैध ठरवले.

          अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधीकाराबद्दल स्त्रीयांना आंदोलन करावे लागले.मात्र, डॉ.बाबासाहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थात स्त्रीयांना पन्नास टक्के आरक्षण दिले.स्त्रीमुक्तीचे समर्थक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महिलाच्या बाबतीत वैचारिक व सामाजिक दृष्ट्या जगात अग्रेसर होते.

          म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतिय स्त्रीला कायदेशीर सक्षम केले असल्याचे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षन संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी संबोधी बुधावीहार व तक्षशिला बुधाविहार यांच्या वर्धापन दिनाला अनुसरून व स्त्री मुक्ती दिनानिमित केले.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर हायकोर्टाचे अधीवक्ता आकाश बांबोडे हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश इंदुरकर यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.चंद्रभान खंगार आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर,समतादूत प्रज्ञा राजुरवाडे,सुरेश डांगे,नरेश पिल्लेवान,एस.पटिल आदी मान्यवर उपस्थित होते.

        समतादूत प्रज्ञा राजुरवाडे पुढे बोलताना म्हणाल्या की,या देशाची प्रगती ही फक्त पुरषाची नसून ती स्त्रीचीपन तेवढीच आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.

    म्हणून देशातील तमाम महिला वर्गानी,”हिन्दु कोड बिल,वाचले पहिजे व स्त्रिमुक्तीची प्रेरणा त्यातून घेतली पाहीजे.आजही स्त्रीयावरील शोषण थांबले नाहीत.मनूस्मृर्ती हा जो विचार आहे,हा ऐक विषारी व्हायर्स आहे.

      तेव्हा आजच्या आधुनिक सुशीक्षित स्त्री ने ठरवले पाहिजे की मनूविचारसरणी स्वीकारायची की भारतिय सविधानाला वाचायचे आहे व अंगीकारायचे आहे.संविधान संरक्षणाची जबाबदारी जास्त ही महिलाची आहे.

        डाॅ.चंद्रभान खंगार यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्ती साठी जे,”हिंदू कोड बिल तयार केले होते ते मंजूर करुन घेतले नव्हते, म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

        मनूस्मुर्ती मध्ये स्त्रियांबद्दल काय लिहले आहे ते स्त्रीयानी वाचावे.धार्मिक स्वंतत्र हे सर्वाना भारतीय सविधानाने दिले आहे.पण,स्त्रीचे अस्तित्व देव भोळेपणामुळे व मनूविचार सरणीमुळे दुर्बळ बनत आहे.तेव्हा सामर्थ्यवाण स्त्री जर बनायेचे असेल तर या मानसिक गुलामितुन स्वतला मुक्त करा व स्त्री मुक्ती दिन हा दिवस समस्त जातीधर्मातील महिलांनी समोर येऊन आंनदाने साजरा करा असे आवाहन डॉ.खंगार यांनी यावेळी केले.

        समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांच्या हस्ते भिमगित प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले.तसेच कव्वाल सूरमा बारसागडे यांचे भारतिय सविधान देवून सत्कार करण्यात आलाय. 

           या कार्यक्रमाचे संचालन हर्षद रामटेके यांनी केले व आभार सुध्दा त्यांनीच मानले.