Home Social पाण्याचा अपव्यय टाळा,पाणी जपून वापरा :- उपसरपंच अशोक चौधरी यांचे नागरिकांना आवाहन…

पाण्याचा अपव्यय टाळा,पाणी जपून वापरा :- उपसरपंच अशोक चौधरी यांचे नागरिकांना आवाहन…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      सध्या वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करणे अत्यावश्यक झाले आहे.या अनुषंगाने ग्रामपंचायत शंकरपूरचे उपसरपंच श्री. अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी शंकरपूर येथील नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.

    ते पुढे म्हणाले की,पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून त्याचा अतिरेकी वापर व अपव्यय केल्यास भविष्यात गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

       त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाणी वापरताना जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

उपसरपंचांनी केलेल्या आवाहनातील प्रमुख मुद्दे….

१) पाण्याचा अनावश्यक वापर त्वरित टाळावा.
२) घरातील नळ व पाईपलाईनची गळती असल्यास तात्काळ दुरुस्ती करावी.
३) वाहन धुणे,अंगण धुणे यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा.
४) शेतीसाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करावा.
५) सार्वजनिक ठिकाणी पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
६) पावसाचे पाणी साठवण (Rainwater Harvesting) यास प्रोत्साहन द्यावे.

       ग्रामपंचायत प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून,नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.पाण्याचा योग्य व नियोजनबद्ध वापर केल्यास भविष्यातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.

     “पाणी ही जीवनासाठी अत्यावश्यक संपत्ती आहे.आज आपण पाणी जपले,तरच उद्या पाण्याची टंचाई टाळता येईल,” असे उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी नमूद केले.

       म्हणून सर्व नागरिकांनी “पाणी अडवा,पाणी जिरवा” या संकल्पनेला साथ देत जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी जपून वापरण्याचे आवाहन मौजा शंकरपूर येथील नागरिकांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी केले.