रोखठोक
प्रा.महेश पानसे
रेती माफीया कुठल्या स्तरावर जाऊन भामटेगिरी करतील हे सांगता येत नाही. महसूल विभागातील जबाबदार तलाठी व अधिकारी या भामटयांची पाठराखण करून शरम या शब्दाला शरम लागेल अशी वर्तणूक का करतात हे कळायला जनतेला वाव दिसत नाही.
मूल तालुक्यातील मरेगाव घाटावर असली भामटेगिरी व महसूल विभागाची बे-शरमगिरी सध्या भारी चर्चेत आहे.
यंदा जिल्ह्यातील घाट नागपूरच्या महसूल मंत्री भक्ताला टेक्याने दिले गेले आहेत. तालुक्यातील घाटांपैकी नेहमी चर्चेत असलेला मरेगाव घाट अती उपसा झाल्याने मयत घाेषीत करून बंद करण्यात आला.
या घाटावर टॅृक्टर, जेसीपी जाऊ नयेत याकरीता खनिकर्म विभागाने खंदक खाेदून मागे बंद केला. माञ मयताच्या टाळूवरील लेणी खाणार नाही ते रेतीचाेर कसले? व या भामट्यांना मदत करणार नाही ते पटवारी व अधिकारी कसले?
मरेगाव घाट बंद केलेल्या खंदकाला वळसा घालून नवीन रस्ता रेती चाेरांनी बनविला. मयत घाेषीत केलेल्या मरेगाव घाटाला पुन्हा ओरबाडून रात्रभर एैश सुरू झाली आहे पण नवल असे की पटवारी आंधळा हाेऊन सरकारचे वसत्रहरणकरीत आहे का? हा सवाल उपस्थित केला जातो आहे.
मूल चे दाेन बिलंदर रेतीचाेर खुलेआम धदयावर बसले आहेत, बिचारे महसूल वाले मयत घाटाची आबरू लुटताना बघतात व बघायची मुहदिखाई घेतात का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.



