ब्रेकिंग न्यूज… — हत्तीने आणखी एका महिलेचा घेतला बळी… — परिसरात हत्तीने माजविला कहर… — हत्तीचा बंदोबस्त करा अन्यथा होणार आंदोलन…

ऋषी सहारे

  संपादक

           आरमोरी परिसरात हत्तीने मुक्काम ठोकला असून मानवी जीवास खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. सालमारा,शंकरनगर, पाथरगोटा हे गाव जंगल व्याप्त व जंगला ला लगुन असल्याने रात्र जागून काढत आहेत कारण असं की देसाईगंज तालुक्यातून सरळ आरमोरी परिसरातील सबंधित गावाजवळून बऱ्याच हत्तीच्या फेऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात हत्तीच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

           आरमोरी तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शंकरनगर येथे दिनांक 29-12-2023 रोजी रात्रीच्या सुमारास साडेदहा वाजेच्या दरम्यान कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर अंदाजे वय 61 वर्ष हे आपल्या परिवारासह शेतामधिल आपल्या घरी असताना शेतामध्ये अचानक हत्ती आल्याने मुलगा महात्मा मंडल याला हत्ती आल्याचे कळाल्याने त्यांनी शेतातून गावाकडे जाण्याकरिता पत्नी वडील आणि आई यांना सोबत घेऊन निघाले असता हत्तीने आपला मोर्चा या तिघाकडे वळवून कौशल्या राधाकांत मंडल या महिलेवर हल्ला केला आणि महिलेला चिरडून ठार केले.

          यामुळे शंकर नगर परिसरात हत्तीच्या दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. सदर घडलेली घटना वनक्षेत्र जोगीसाखरा उपक्षेत्र पळसगाव परीक्षेत्र आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे घडली.

         परिसरात असलेल्या हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे परिसरातील जनतेत बोलल्या जात आहे. वनविभागा प्रती रोष व्यक्त केला जात आहे. वाघाच्या दहशतीत या परिसरातील जनता वावरत आहेच पुन्हा हत्तीची दहशत आल्याने जगावं कसं असा यक्ष प्रश्न निर्माण झालं आहे.