Home देशविदेश बिहारनंतर आता भाजप प. बंगालमध्ये बहुमताने सत्तेत येणारच……

बिहारनंतर आता भाजप प. बंगालमध्ये बहुमताने सत्तेत येणारच……

       RSS / मोहन भागवत / मोदी / शहा / फडणवीस आणि मित्रपक्ष यांच्या संविधानविरोधी षडयंत्राला नेभळट संविधानवादी शक्ती बळी पडल्यानेच हे शक्य होत आहे.

         त्यातल्या त्यात विशेष म्हणजे विचार करणाऱ्या बुद्धीजीवी वर्गाने अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास Intellectual Class यांनी फुटकळ स्वार्थासाठी मौन धारण केल्यानेच हे सर्व घडत आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, बाबासाहेबांची संविधान क्रांती आम्हीच संपवली असं जर वर्णन केले, तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही.

    कारण , इतिहास आहे……

       2023 मध्ये हरियाणाच्या विधानसभा निवडणूका झाल्या त्यावेळी एकही मोदी / शहानी प्रचारसभा किंवा रॅली काढली नाही……..

    त्यापूर्वी तिथे पाच वर्षे भाजपचीच सत्ता होती………

     त्या कार्यकाळात त्यांच्या मंत्र्यांनी खेळाडूंवर लैंगिक शोषणाचा आरोप असताना सुद्धा……..

      काँग्रेस व मित्रपक्षांचे हरियाणात चांगले वातावरण असताना सुद्धा………

        प्रचारसभेतील मीडियावर प्रेसकॉन्फ्रेसमध्ये बोलताना तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणतात, ” डरणे की कोई बात नही, हमने सारा इंतेजाम करके रखा है, छत्तीसगड मे जो हुआ है, वही हरियाणा मे होने जा रहा है. 8 अक्टोबर को EVM खुलेगी, तब काँग्रेस रोएगी और कहेगी की EVM ने इनको जिताया है.”

        आणि झालेही तसेच, 8 अक्टोबर रोजी मतमोजणीच्या दिवशी पहिल्या एका तासात पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत काँग्रेस आणि मित्रपक्ष सर्वात पुढे आणि भाजप सर्वात मागे. जेंव्हा EVM उघडली तेंव्हा भाजप सर्वात पुढे आणि काँग्रेस मित्रपक्ष सर्वात मागे शेवटपर्यंत…….

  शेवटी विजय प्रचंड बहुमताने भाजप सत्तेत……!

   याचा अर्थ काय…..?

  नायबसिंग सैनीला भविष्य कसे कळाले होते…….?

          त्यानंतर त्याचदिवशी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयासमोर मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आणि हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात होणार याचे सूचक वक्तव्य केले. विदर्भातील प्रचारसभेत मोदींनी जाहीर वक्तव्य केले की, हरियाणा मे जो हुवा है, वही महाराष्ट्रमे होने जा रहा है. पहेले से कई ज्यादा सिटे हमे महाराष्ट्र मे मिलने जा रही है. “

    झालेही तेच……..

      वाऱ्याने छ.शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी…….

      बदलापूरातील अक्षय शिंदे बालिकेवर बलात्कार करून शेवटी त्याचाही एनकोउंटर झाला तरी……

      सकाळी 8 वाजता गुपचूप चोरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली तरी………

      50 खोके, सबकुछ ओके करून गुवाहाटी व्हाया गुजरात वरून महाराष्ट्रात अलीबाबा 40 चोर होऊन सुद्धा……..

      नालासोपारा येथील हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडेला 9 कोटी रुपये वाटत असताना पकडलेले असताना ( पुढे निवडणूक आयोगाची ना नोटीस ना कार्यवाही ) सुद्धा……….

     नोटांच्या बंडलांची जीप पकडली गेली असताना सुद्धा………

      अशी कितीतरी असंख्य उदाहरणे घडलेली असताना सुद्धा………

      महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार 288 पैकी 232 जागा जिंकून सत्तेत येणे…….

       म्हणजे स्पष्ट संकेत हेच की आमच्या मताचे हणन EVM द्वारे करून……., मित्रपक्षांना ब्लॅकमेल करून………, संपूर्ण प्रशासनाला हाताशी धरून……… निवडणूक आयोगाला आपली रखेल करून…….. भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविली…….!!!!

     त्यानंतर दिल्ली काबीज केली…… 

     आता प. बंगाल सुद्धा याच मार्गाने घेणार………

  पुढच्या वर्षी 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हाच पायंडा पाडुन भाजप सत्तेत पुन्हा येणार…….

   असे करत…..

    करत……..

        2029 च्या लोकसभा निवडणूक येईपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त बहुमताने भारतातील राज्यात सत्तेत भाजपच असणार……..

      मग केंद्रात लोकसभेत याच मार्गाने पाशवी बहुमताने ( 400 पेक्षा जास्त ) सत्तेत भाजप येऊन……

      मग संविधान बदलणार……!

         त्यानंतर हळूहळू मनुस्मृती कायदे लागू करून पुन्हा एकदा अवघ्या 75 वर्षात स्वातंत्र्याचा अस्त होऊन गुलामीची काळकोठडीची देशात सुरुवात होणार…….!   

       हे आहे RSS / मोहन भागवत / भाजप / मोदी / शहा / फडणवीस / यांचे हतबल मित्रपक्ष यांचे स्वप्न……!

     अशा भारताच्या गंभीर परिस्थितीचे ………

 अजूनही कुणाला गांभीर्य नाही हे विशेष………

      छोटा / मोठा विरोधीपक्ष आपलीच दुकाने टिकविण्यात दंग……..

        बुद्धीजीवी वर्ग तर सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून काहीतरी पदरात पाडुन घेण्यात मग्न………

        बिचारा भारतीय नागरिक तर यांचेच अनुकरण करणार ना, त्यात याचा काय दोष……?

         अशा प्रकारे आमच्या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी याच दिवसासाठी देशाला स्वतंत्र केले होते का……?

          याच दिवसासाठी म.गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौ. अबुल कलाम आझाद, लाला लजपतराय ( पंजाबचा सिंह ), नेताजी सुभाषचंद्र बोस, इत्यादी असंख्य नेत्यांनी आपले सर्वस्व बलिदान आणि समर्पण केले का……?

        विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवसासाठी भारतात संविधान क्रांती करून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता निर्माण करण्यासाठी केवळ 65 वर्षाचे आयुष्य वाया घालविले का………?

     असे जर असेल…..

असेच होणार असेल……

       तर आम्ही भारताचे लोकं म्हणून एक जबाबदार संविधाननिष्ठ भारताचा नागरिक म्हणून माझी स्वतःची घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी काय असावी….?

     जबाबदारी हीच……..

        या RSS / मोहन भागवत / भाजप / मोदी / शहा / फडणवीस /यांचे मित्रपक्ष यांच्या संपूर्ण पराभवासाठी कंबर कसणे……

       त्यासाठी…….

        यांचा जीव ज्या EVM मध्ये आहे तीला लोकसभा निवडणूकीत दिसू न देणे…….

      बुद्धीजीवी वर्गांवर अवलंबून न राहता……..

       संविधानाने मला या देशाचा मालक बनविलेले असताना मी या संपूर्ण व्यवस्थेचा गुलाम म्हणून का जगू……?

     हा स्वतःला प्रश्न विचारून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या ध्येयासाठीच जगणार आणि संपणार. हाच माझा कायम दृढ आत्मविश्वास……..!

   मी तर यासाठीच जगणार……..

   तुम्ही………?

        आवाहनकर्ता 

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689