आळंदी देवस्थानचे विश्वस्त देसाई, ढगे पाटील आणि देशमुख यांना मुदत वाढ…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ३ विश्वस्तांना मुदत वाढ मिळाली असून संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा कार्यकाल पूर्ण झालेल्या तीनही विश्वस्तांना पुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मुदतवाढ दिली असल्याची माहीती प्रमुख विश्वस्त विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

        संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांचा १६ मे पर्यंत विश्वस्तपदाचा कार्यकाळ होता. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत एकूण विश्वस्त संख्या सहा आहे. सहा ही विश्वस्तांची मुदत संपली असून सध्या सहा पदे रिक्त होत आहेत. या सहा पैकी तीन विश्वस्त पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार आहे. मात्र, अवघ्या वीस – पंचवीस दिवसांवर आषाढी पायी वारी सोहळा आला आहे. या दरम्यान विश्वस्त पदे रिक्त असणे अडचणीचे ठरणारे होते. या हेतूने सध्याच्या विश्वस्तांना मुदत वाढ मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मुदत वाढ मिळाल्याने यंदाचा पायी वारी सोहळा याच तीन विश्वस्तांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.