आयुर्विमा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रोशन कापगते यांचा सत्कार….

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

      साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागातील साकोली शाखेत मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभिकर्त्यांचा साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांच्या हस्ते ( दि. १५. मे ) रोजी कार्यालयात ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारोह प्रसंगी आकर्षणाचा केंद्रबिंदू साकोली शाखेतील विमा अभिकर्ता सिरेगाव बांध रहिवासी रोशन कापगते हा ठरला.

        रोशन कापगते यांनी मागील आर्थिक वर्षात आयुर्विमा क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत ग्रामीण भागातील ११८ पॉलिसी पुर्ण केल्या आहेत. त्यांच्या या सफलतापूर्वक कार्याबद्दल त्याचे सर्वच स्तरांवर विशेष कौतुक केले जात आहे. रोशन कापगते यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर सानगडी भागातील लोकांना पॉलिसी सेवा देण्यासाठी गजानन महाराज चौकात स्वतःचे विमा संकलन केंद्र तयार केले व ग्रामीण भागातील लोकांना पॉलिसी विषयी सेवा देण्याचे महत्वपुर्ण काम सुरू केले आहे. तसेच सानगडी व परीसरातील दहा ते पंधरा किलोमिटर वरील सर्व क्षेत्रातील लोकांना आयुर्विमा विषयी सेवा देण्याचे महत्वपुर्ण कार्य रोशन कापगते यशस्वीपणे पूर्ण करीत असून त्यांच्या या कार्याची चर्चा सानगडी क्षेत्रात होत आहे. विमा क्षेत्रात रोशन कापगते यांनी स्वतःचे एक लक्ष्य ठरवून नवीन पॉलिसी स्पर्धेत ज्या पद्धतीने कार्य करीत लोकांना विमा सुरक्षा देण्याकरिता पॉलिसी केल्या आहेत ते पाहता साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांनी रोशन कापगते यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिनांक १५ मे २०२३ ला झोनल मॅनेजर ट्रॉफी देऊन सत्कार केला.

         विमा क्षेत्रातील अवध्या दोन वर्षाच्या कमी कालावधीत रोशन कापगते यांना जे यश मिळाले त्याचे श्रेय समुह प्रमुख पुजा कुरंजेकर यांना जाते. त्यांच्या लीडरशिप मध्ये रोशन कापगते यांनी विमा क्षेत्रात प्रगती केली आहे हे विशेष. तसेच रोशन कापगते यांनी आपल्या यशाचे श्रेय ग्रुप लीडर पुजा कुरंजेकर व साकोली शाखेत अभिकर्त्याचा उत्साह वाढविण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका निभावणारे साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांना दिले आहे. याप्रसंगी रोशन कापगते यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करतांनी सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांनी सांगितले की, विमा क्षेत्राचे भविष्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभिकर्त्यांच्या हातात आहे व त्याच्या कार्यावरच विमा क्षेत्राचे अस्थित्व टिकून राहणार आहे असे प्रतिपादन केले.