भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे संचालक संजय बोडके व हानुमंत सुतार यांनी केली  असता अखेर तातडीने आर्जाची दखल घेऊन भीमा नदी पात्रात पाणी सुटले… –भीमा नदी पात्रातील प्रत्येक बंधाऱ्याला संपूर्ण दारे टाकून शेतीला पाणी आडवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची मागणी..

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे बारामती लोकसभेच्या प्रचार दौऱ्या निमित्त दिनांक 3 मे रोजी बावडा तालुका इंदापूर येथे आले असता.

        भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी संचालक संजय बोडके व सामाजिक कार्यकर्ते हानुमंत सुतार पिंपरी बुद्रुक यांनी मागणी केलेल्या अर्जास अखेर 10 मे रोजी यश आले. आणि भीमा नदी पात्रात खळखळून पाणी आले याचा आनंद शेतकरी व गोरगरिब जनतेला झाला.

            प्रचार सभेत बावडा येथे शेतकऱ्यांसाठी 3 मे रोजी दिलेला शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाळला. म्हणूनच उजनीतून भीमा नदी पात्रात पाच टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले. त्यामुळे पिंपरी बुद्रुक येथील सर्वच कार्यकरते यांच्यामध्ये उत्सुकता व आनंद निर्माण झालेला आहे. पालकमंत्री अजित दादा पवार यांचे अनेक भागा-भागातून शेतकरी आभार व्यक्त करू लागले आहेत. 

        अजित दादा पवार यांच्या कामाची पद्धत जे बोलतात ते करूनच दाखवीतात 3 तारखेला भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी दिलेला शब्द अखेर दखल घेऊन शुक्रवार दिनांक 10 मे रोजी भीमा नदी पात्रात पाणी आले. शेतकऱ्यांच्या शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले याचा आनंद या भागातील शेतकऱ्यांना होऊ लागला.

        उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे या भागातील संजय बोडके व हनुमंत सुतार यांच्या सहित सर्वच ग्रामस्थ व शेतकरी यांनी आभार व्यक्त केले.