सवित्रीमाईला अपेक्षीत असलेल्या सवित्रीच्या लेकी आपण खरोखरच आहोत का?-समतादूत प्रज्ञा राजुरवाडे 

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

          सवित्रीबाई फुले भारतीय स्त्री मुक्तीच्या जनक होत्या.आपल्या आयुष्यातिल काट्याची फुले करुण ज्या काळात स्त्रीला स्वताच्या अस्तित्वाची जानीव नव्हती त्या काळात स्त्रीयांना हक्क व अधिकाराची जानीव करुण दिली.

          व्यवस्थेने त्यांच्या अंगावर फेकलेल्या शेनाची,दगड,धोंडाची पर्वा सवित्रीमाईनी कधीही केली नाही,हा अपमान कोणासाठी सहन केला व का केला असेल?आम्हा स्त्रीवर्गासाठी हा क्षणभर विचार व आत्मचितंन करण्यासारखे आहे.

          सवित्रीबाई फुलेची जयंतीनिमित्त त्यांची आठवण करायची का? त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आम्हा स्त्री वर्गावर आहे.सवित्रीमाई कळण्यासाठी अजुन आम्हाला किती वेळ लागनार आहे? सवित्रीमाईला अपेक्षित सवित्रीच्या लेकी आपन आहोत का?असे परखड सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षन सस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी माळी समाज नवतळा येथे सवित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात केला.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी आश्रमशाळेचे मुख्य्ध्यापक सुकारे होते तर प्रमुख अतिथी राजू देवतळे भाजपा ओबीशी प्रदेशाध्यक्ष तथा गुरुदेव प्रचारक मोझरी,बालू पिसे भाजप युवा तालुका अध्यक्ष,रमेश कंचरलवार उपसरपंच तूळशीराम शिवरकर,ग्रा सदस्य संगीता टेंभुर्णे,कविता वसाके,गिताबाई कैकाडे,सुनदाताई शेंडे,मुकनायक फाउडेशंनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम,प्रा.ठवरे,प्रा.चटपकार,केल्झरकर,गुलाबराव श्रीरामे,गोपाळराव गुरनुले, अण्णाजी वसाके आदी मान्यवर उपस्थीत होते.

          पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या सवित्रीमाई मुळे आम्ही स्वतचे सक्षम आकाश निर्माण करु शकलो.शैक्षणिक,आर्थिक राजकिय ओळख निर्माण करु शकलो.आणि कायद्याच्या सरक्षणनामूळे जास्त सक्षम आहोत.पण खऱ्या अर्थाने सवित्रीमाईनी समाजीक समता निर्माण करण्यासाठी रुढी परंपराना छेद देवून नवविचारांची कास धरायला लावली,त्यांच्या दुरदृष्टीचा विचार करता समाजात असलेल्या चुकीच्या प्रथा आहेत, त्यांना कायमचे नष्ट करण्यासाठी आम्ही काही भूमिका स्वीकारल्या आहेत का?

          कर्मठ व रुढीवादी समाज प्रवाहाच्या विरोधात वाहने हे सोपे नसते,ते धाडश,ते हिम्मत सवित्रीमाईनी सवित्रीच्या लेकीना दिले आहे.पण प्रवाहाच्या विरोधात लीहणे,बोलणे ही हिम्मत महिलामंधे आली आहे का?सवित्रीना अपेक्षीत सवित्रीची लेक ही विज्ञानाची कास धरनारी स्वाभीमानी व आत्मनिर्भर स्त्री जानीवाचा निर्भर हुंकार अशी होती.

         आपण खरच विज्ञानयुगात तो हुंकार निर्माण करु शकलो का?स्त्री मुक्ती कशातुन? स्वतःच स्वताच्या बांधलेल्या बंधनातून की आपल्या मानसिक बुद्धीतुन सक्षम आपन आहोत का?

          स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे अशी म्हणनारी समाजव्यवस्था स्त्रीभृन हत्या करते,हुंड्याला बळी पडते तेव्हा कितीतरी महिला वर्ग चुपचाप असतात,सवित्रीमाईना हे अपेक्षित होते का?

         त्यानी वीधवानो तूम्ही इथे या,मी तुमचे बाळन्तपंन करते असे वाटचूकलेल्या स्त्री वर्गाना समजावून आधार दिला.आज मुलीचे पावूल कदाचित चुकीचे पडले किवा तिच्यावर समाजकंटकानी अत्याचार केला तर समाज व महिलावर्ग तिला नव्याने जगण्याची प्रेरणा, आत्मविश्वास,आधार,सन्मान देणार का?

         विधवा महीलांना हळदीकुंकू कार्यक्रमात आम्ही बोलवणार की नाही? तृतीयपंथीयाना आम्ही समाजातिल सर्व समान संधी देणार आहोत की नाही? 

        शिक्षण हे मानवी जिवनात कितीतरी बदल घडवते.स्त्री शिकली म्हणजे समाजात चांगला बदल घडवुन आणू शकते,व्यवस्थेला प्रश्न विचारते,मुक्ता साळवे सारखी धर्म चिकित्सक व्यवस्थेला प्रश्न विचारनारी सवित्रीमाईच्या विद्यार्थ्यांनी सारखी आम्ही हिम्मतवान,धर्यवाण,विद्यार्थिनी घडू शकनार की नाही?…..

           सवित्रीमाईनी परिवर्तनाचा वसा तुम्हा आम्हासाठी घेतला होता. सवित्रीची लेक वैचारिक पातळी असलेली आजची शिक्षीत महिला आपनच आहोत,तेव्हा सवित्रीच्या विचारातुन सक्षम होणे गरजचे आहे.प्रस्थापित सरकारने सवित्रीबाई फुले,महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कारानी सन्मानित करावे अशी आशा सुध्दा समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी व्यक्त केली.हीच सावित्रीमाईला खरी आदरांजली होईल असेही त्या म्हणाल्या.

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज अध्यक्ष महादेव कोकोडे यांनी केले तर संचालन व आभार योगेश कोटरंगे यांनी केले. 

        यावेळी समस्त माळी समाज उपस्थित होता.