प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
नवी दिल्ली
महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशव्यापी आंदोलन होणार आहे.या आंदोलनात देशभरातून हजारो बौद्ध बांधव सहभागी होणार असून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी ठामपणे केली जाणार आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की,महाबोधी येथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली,हे संपूर्ण जग मान्य करतं.
मात्र,आज त्या पवित्र स्थळी बुद्धांना स्थान नाही,ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे असणं आवश्यक आहे,या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
आमदार राजकुमार बडोले यांनी माहिती देताना पुढे सांगितले की,त्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली असून,मंत्री रामदास आठवले यांनीही विविध स्तरांवर भेटी घेऊन हा विषय सरकारपुढे मांडला आहे.
दरम्यान,संघरत्न भंते यांनी सांगितले की,दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी जागृती यात्रा आम्ही महाराष्ट्रात काढली होती.बौद्ध अनुयायांमध्ये जनजागृती करणं हाच आमचा उद्देश होता आणि आहे.
1949 चा बिहार मंदिर व्यवस्थापन कायदा हा कसा अन्यायकारक आहे,हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं.
ते पुढे म्हणाले,महाबोधी येथील बुद्धविहार बुद्धांच्या ताब्यात यावा हे सरकार मान्य करत नाही,ही गंभीर बाब आहे.बौद्धांच्या विहारात इतर धर्मीयांचे नियंत्रण का?,हा आमचा मूलभूत प्रश्न आहे.
याआधी भंते विनयाचार्या यांनी जेव्हा देशव्यापी आंदोलन उभं केलं,तेव्हा त्यांना तब्बल 68 दिवस कारागृहात डांबण्यात आलं होतं.
12 फेब्रुवारी रोजी जंतर मंतर,नवी दिल्ली येथे होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र,तथागत भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले महाबोध्दी महाविहार बौद्ध भिख्खूंच्या आणि बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यायला,”भारत सरकार आणि भारत देशांतर्गत असलेले बिहार राज्य सरकार,तयार नाही.
यामुळे भारत सरकार आणि बिहार राज्य सरकार हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सम्यक तत्वज्ञानाला घाबरते काय? हा प्रश्न पडतो आहे…
तसेही भारत देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती राजश्री शाहू महाराज,संत तुकाराम महाराज,संत जगनाडे महाराज,संत गाडगेबाबा,संत रविदास,संत घासीदास,संत नामदेव महाराज,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि इतर बहुजन समाजात जन्मलेल्या संत महापुरुषांच्या लोकहितार्थ तत्वज्ञानाचा तिव्र विरोध,”भारत देशातील मनुवादी,उच्चवर्णीयांच्या हिंदू संघटना,भारत सरकार आणि भारत देशांतर्गत राज्य सरकारे त्यांच्या छुप्या एजंड्यातंर्गत करतात हे वास्तव आहे…
म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले महाबोध्दी महाविहार हे बौद्ध धर्मीयांच्या व बौद्ध भिख्यूंच्या ताब्यात द्यायला भारत सरकार तयार नाही,हा इतिहास आहे.
कारण महाबोधी महाविहाराच्या नावावर बऱ्याच देशांमधून मिळणारा अब्जो रुपयांचा निधी हळपणे हा एकच उद्देश मनुवादी तथा ब्राम्हणवादी भारत सरकारचा व बिहार राज्य सरकारचा असावा असे दिसून येते आहे.



