कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायला ज्ञानाची गरज असते:- पोलीस अधिक्षक रविंद्र परदेशी… — सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न.. — ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे केले होते कार्यक्रमाचे आयोजन…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज़ भारत

       सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         सायबर सुरक्षा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व बालकांचे लैंगिक शोषण विरोधी कायदा या विषयावर विस्तृत मार्गदर्शनही या वेळी करण्यात आले. 

           फेसबुक,व्हाट्सअप,युट्युब व इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमावर तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तिथे बेजबाबदार पणाने वागणारे लोक मोठ्या प्रमाणात गुन्हे करतात.काही लोकांना ब्लॅकमेल करतात.

         इंटरनेटच्या जाळ्यात आपणास सर्वच लोक अडकलेलो आहोत.इथे अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होते.त्यात अनेक लोक आत्महत्या करतात आणि काही लोक तुरुंगात जातात. 

          विद्यार्थ्यांनी या वयात केवळ अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.जीवनात यश मिळवण्यासाठी कष्ट उपसले पाहिजे.असे प्रतिपादन कम्युनिटी सेलचे पोलीस निरीक्षक रोशन इरपाते यांनी केले.तसेच सायबर हजिन प्रॅक्टिशनर मुजावर युसुफ अली यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. 

           त्यानंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नियमित वर्तमानपत्राचे वाचन केले पाहिजे.जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाची गरज असते.हे ज्ञान विविध ग्रंथातून जसे आपणास मिळते तसे वर्तमानपत्रातूनही मिळते.

           रोजचे वर्तमानपत्र वाचण्यासोबतच रेडिओवरील आणि टीव्हीवरील इंग्रजी बातम्या आपण ऐकल्या पाहिजे.माय मराठीवर प्रेम केले पाहिजे.रोज नियमित शुद्धलेखन करण्याचा सराव करून वाचनात सातत्य ठेवले पाहिजे. 

           आज आपण विद्यार्थी आहोत,आपली भूमिका ज्ञानग्रहण करणाऱ्याची असली पाहिजे.नंतर आपल्या घरी आपण शेतीत श्रम करणाऱ्यांच्या भूमिकेत असायला हवे.अभ्यास करीत आपल्या पालकांना कामात मदत केली पाहिजे.आपली नाळ सतत शेतीमातीशी जोडून ठेवणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन करीत विद्यार्थ्यांना श्रममूल्याचे महत्व पटवून दिले.त्यांनी अनौपचारिकपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधून नैतिक आचरण व ध्येय निश्चिती या संदर्भात स्वानुभव सांगत मार्गदर्शन केले. 

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाकरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सदानंद बोरकर,सपोनि तुषार चव्हाण,प्रभारी पोलीस स्टेशन सिंदेवाही,सागर महल्ले पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. सिंदेवाही,पोलीस अंमलदार रणधीर मदारे (गोपनीय शाखा) पो.स्टे. सिंदेवाही तसेच सिंदेवाही तालुक्यातील विविध गावातील पोलीस पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व आठसे ते ९०० विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 

           कार्यक्रमातंर्गत उपस्थित सर्वांचे आभार हेमंत मेश्राम यांनी मानले.