डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अपेक्षीत असलेली समाज निर्मिती म्हणजे प्रबुध्द समाजनिर्मिती होय.- समतादूत प्रज्ञा राजुरवाडे.. — शिवणपायली येथील दोन दिवसीय धम्म परिषदे अंतर्गत मनोगत..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जगातिल सर्व मानवी कल्याणाकरिता मानवतेचा रचनात्म्क विचार बुधाधम्मात मिळाला व्य्कती व संपुर्ण समाज जिवनात नितीला महत्व आहे,निती हेच बुध्दधम्माचे केंद्र आहे.

       पंचशिल,अष्टशिल,निब्बान सिधान्त दशपारमिता हे आदर्श जिवन जगण्याचा मार्ग आहे.पंचशिल हे व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर,अष्टशिल सामाजिक पातळीवर सूधारना घडवुन आणन्यासाठी आहे तर निब्बान सीधान्त हे अष्टशीलाचे पालन करताना आलेल्या अडचणींवर चर्चा करते‌.

          दस पारमिता मनुष्यत्वाला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आहे व अशी नितिमाणसमाजनिर्मिती मानव सेवा करण्यास सक्षम आहे.त्यात मानवीदुख,वर्गकलह शोषण दुर करुन समताधिस्टीत लोकशाही समाजाचे स्वप्न आहे म्हणून डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेली समाजनिर्मिती म्हणजे प्रबुध्द समाजनिर्मिती होय,असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी मिलिंद बुध्दविहार नागसेन वनधम्मभुमी बहुउदेशस्मारक मंडळ शीवनपायली येथे रामजीबाबा आंबेडकर यांच्या स्मुर्तिदिनानिमित्ताने दोन दिवशीय बुध्द धम्मपरिषदचे आयोजन केले होते.

      त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेली समाजनिर्मिती व ध्म्मक्रांतीचे पाच सूत्रे याविषयावर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रज्ञा राजूरवाडे बोलत होत्या.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एम.डांगे होते तर उदघाटक म्हणून पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम होते.

       प्रमुख मार्गदर्शक प्रा.अनुपकुमार नालंदा ऐक्डमी वर्धा,प्रा.डाॅ.दिलिप पाटिल अलिबाग मुंबई समतादूत प्रज्ञा रजुरवाडे,चिमुर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे समन्वय माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ महारास्ट्र प्रदेशचे डॉ‌सतिशभाऊ वारजूरकर,पोलिस निरीक्षक चिमुर योगेश घारे,प्रा.संजय बोधे,माजी पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके,किशोर आंबादे लोकमत पत्रकार विकास खोब्रागडे,समाजसेवक कनाथ गोंगले,पोलिस पाटिल महेंद्र डेकाटे आदी उपस्थित होते.

         धम्मपरीषदेच्या दुसऱ्यादिवशी बौद्धध्म्म संभारंभाचे अध्यक्ष महास्थविर पूज्य भदंत शीलान्दजी,महास्थिवर पूज्य भदंत ज्ञानज्योती,पूज्य भदंत यश (महामेवा महावीहार श्रीलंका,)पूज्य भदंत डॉ.ध्म्मचेती, पूज्य भदंत धम्मवंश (बंगाल ), पूज्य भदंत सोन,पूज्य भदंत इंदमुनी (उरवेला बुधगया) यांनी धम्मशीलाचे पालन व ध्म्मदेशना दिली.

        आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू मानव आहे,येथील मानुस टीकेल तर राष्ट्र,जग टीकेल हा धम्मपरीषदेचा मुख्य उदेश आहे.आंबेडकरी व बुध्द धम्माच्या आदर्शाची विचारधारा सविधानिक मुल्य मजबूत होन्यासाठी आहे.तेव्हा संपुर्ण मानव कल्यानाकरिता बुध्द धम्म प्रचारप्रसार करने ही जबाबदारी आंबेडकरी अनुयायांची जास्त आहे.

       प्रबुध्द समाजाशी जगातील सामाजिक, आर्थिक, राजकिय, शैक्षणिक,लोकशाहीचे भविष्य निगडीत आहे.असे जागतिक मानवी कल्यांन हे बुध्द तत्वज्ञानाशिवाय शक्य नाही आहे असे संपुर्ण मार्गदर्शनातंर्गत चर्चा धम्मपरिषदेमंध्ये करण्यात आली.

        यावेळी मनोज राजा गोसावी यांचा भिमबुध्दगितांचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन डेकाटे यांनी केले तर संचालन बालकदास पाटिल यांनी केले व आभार साहिल खोब्रागडे यांनी मानले.