पीपल्सचा घेतला निरोप
मनात आठवणींचा दरवळ
जुमानून लागायचंय कामाला
नाही करायची हळहळ
म्हटलं असं कितीही जरी
हुरहुर आहेच काळजात
फुलवणाऱ्या सहवासाची
आठवण कायम राहील मनात
स्वामीजींच्या ध्येयवादातून
पीपल्स झालं साकार
कैक पिढ्या शिकल्या या भूमीत
मिळाला जीवनास उत्तम आकार
साकार करायचाय एकजीव भारत
जाळायचीयेत खुरटी जळमटं सारी
लाख धुमार्यांनी
उमलयवाचंय साऱ्यांना
घेण्यासाठी उंच भरारी



