दहावी व बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व समुपदेशन तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न.

भाविक करमनकर 

धानोरा प्रतिनिधी

        नुकत्याच दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाले आणि यात होते काही पास तर काही नापास झाले परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व समुपदेशन तालुकास्तरीय कार्यशाळा जेएसपीएम महाविद्यालय धानोरा येथे आयोजित करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  चव्हाण सर तर प्रमुख पाहुणे म्हणून साखरे सर डायट जिल्हा शिक्षण प्रशिक्षण गडचिरोली तसेच दुगा मॅडम राऊत सर सहारे सर महाविद्यालयातील प्रा डॉ किरमिरे सर प्रा डॉ लांजेवार सर हे मंचावर उपस्थित होते. जे विध्यार्थी वर्ग दहावी व बारावी अनुत्तीर्ण किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी प्रा खोब्रागडे सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून केली.

      नापास झाले की विद्यार्थी आत्महत्या करताना दिसत आहे नापास झाले म्हणजे सर्व शिक्षण संपलं असे होत नाही तर पुढील वाटा त्याला आयुष्यातून शोधून काढणे आणि त्याला न्याय देणे हे त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांमधून दिसून येते विध्यार्थी वर्ग दहावी बारावी नापास झाला असला तरी त्याच्यामध्ये इतर गुण असतात की ते गुण हेरून त्या विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी हे करत असताना त्यांनी आपले मन विचलित न होता आत्महत्या सारखा शेवटचा किंवा टोकाचा पर्याय न निवडता आवड क्षमता व संधी त्यातून आपला मार्ग काढावा यासाठी प्रेरणा व समुपदेशन कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.

      या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून साखरे सर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यालय गडचिरोली यांनी दहावी बारावी नापास विद्यार्थाना समुपदेशन करण्यात आले. आज विद्यार्थ्यांना गरज का पडली विद्यार्थी अशी टोकाची भूमिका का निवडतात या प्रश्नाची उकल करण्यासाठी आणि त्यांच्या अंगी असलेले गुण हेरून त्यांना त्या विषयांमध्ये किंवा त्या त्यामध्ये प्राविण्य मिळवून पुढील आयुष्य सुखकर करता येईल असे त्यांनी आपल्या समुपदेशनातून सांगितले यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व धानोरा तालुक्यातील दहावी व बारावी नापास विद्यार्थी व त्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम प्रास्ताविक प्रा.आवारी सर यांनी केले तर आभार प्रा. करमनकर सर यांनी मानले.