दखल न्यूज भारतचे सर्वेसर्वा तथा मुख्य संपादक प्रदिपजी रामटेके सरांची,”एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती…. — संकटावर मात करुन परिस्थितीशी खंबीरपणे झुंज देणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व,तद्वतच कर्तव्यतत्पर-निर्भीड-संवेदनशील अशा व्यक्तीमत्वाची उत्तुंग भरारी…..

प्रितम जनबंधु

   संपादक 

        आपल्या निस्वार्थ,निर्भिड तथा कर्तव्यदक्ष जबाबदारीवर ठाम राहुन अनेक शिखरे पादाक्रांत करण्यासाठी परिस्तिथीची अनवरत झुंज देणारे,पत्रकारितेतील दांडगा अनुभव जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतुन आपली आगळीवेगळी छाप पाडणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व,तद्वतच शांतीप्रिय-संवेदनशील मनोधैर्याचे धनी आणि एक पत्रकार ते मुख्य संपादक असा पत्रकारितेतील खडतर प्रवास पार करुन आपली प्रगत ओळख निर्माण करणारे दखल न्यूज भारतचे सर्वेसर्वा तथा मुख्य संपादक,आमचे प्रेरणास्थान आ.प्रदिपजी रामटेके सर यांची “एन.जागतीक मानवाधिकार संघटना” राज्यस्तरीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती होणे ही एक त्याच्या कार्यकर्तुत्वाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल ..!

         एका शेतकरी कुटुंबात झालेला जन्म.घरची परिस्थिती हलाखीची असली तरी अनेक खडतर प्रवास व कठीण प्रसंगाना चिरत आपल्या प्रगतीची पाऊलवाट स्वत: तयार केली असुन त्या खडतर वाटेवर यशस्वी वाटचाल,अनवरत आणि अगदीच निरागसपणे आ.प्रदीप रामटेके सर करीत असल्याचे पावलोपावली जाणवते आहे.

         मुख्य संपादक प्रदिपजी रामटेके सर यांनी कर्तव्यदक्ष,सहनशील व खंबीर नेतृत्व साकारत आड येणाऱ्या अनेक खडतर परिस्थितीवर मात करुन परिस्थितीशी झुंज देत अनेक यशाचे शिखर प्राप्त केले आहेत.एवढच नव्हे तर “दखल न्यूज भारत” पोर्टलच्या रुपाने स्वताच हक्काच व्यासपीठ उपलब्ध करुन बातम्यांच्या माध्यमातून विदर्भातील जनसामान्याच्या समस्या निकाली लावण्यास महत्वाच योगदान देत आहेत.

        त्यासोबतच दखल न्यूज भारत जनसामान्यांच्या मणामणात रुजली असुन दखल न्यूज भारत परीवारातील प्रत्येक पत्रकाराच्या जिवणप्रवाहाला सातत्याने गती दिली आहे.त्याच धर्तीवर आज जागतीक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.पांडूरंग नरवडे सर यांनी आ.प्रदीप रामटेके सरांची राज्यस्तरीय कार्यकारी अध्यक्ष पदावर केलेली निवड आ.प्रदीप रामटेके सर नक्कीच सार्थकी ठरवतील अशी खात्री देतो आहे ….!

           पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्व तद्वतच अभूतपूर्व लिखाणाच्या जोरावर आपला प्रभाव कायम ठेवत जनमानसात आपली आगळीवेगळी छबी निर्माण केली आहे.अनेक अग्रलेख प्रकाशीत करुन त्यासोबतच निस्वार्थ भावनेचा अंगीकार करुन पत्रकारीता कसी असायला हवी,पत्रकारिता करताना कोणकोणत्या बाबी कशाप्रकारे हाताळल्या जाव्यात.बातमी संकलीत करताना ते कशारितीने संकलीत करावी याची इत्थंभूत माहीती कशी प्राप्त करता येईल यासाठी मुख्य संपादक प्रदिपजी रामटेके सर यांची कार्यपद्धत व प्रेरणा उल्लेखनीय ठरावी असीच आहे. 

      “इतरांसाठी सर्वकाही करतात पण,स्वतः साठी देखील काही करावे हे विसरतात.. खरंच तुमच्यासारखे आदरणीय व्यक्ती जगात खूप कमी भेटतात….”

            प्रखर विचारशीलते अंतर्गत समाजमनाचे हित जोपासनारा,सखोल सहनशीलतान्वये उज्वल भविष्यावर ताकद पणाला लाऊन अनेक यश संपादन करणारा,अष्टपैलुत्व व प्रभावशाली नेतृत्व साकारनारा,तद्वतच नशीबवान म्हणून भाग्याची शिदोरी सोबत घेऊन आलेले एक संवेदनशील लढवय्ये-योद्धा मुख्य संपादक प्रदिपजी रामटेके सर यांना अवघ्या काही दिवसातच अनेक भाग्योदय प्राप्त झाले आहेत.

          शिवाय त्यानी आपल्या निस्वार्थी,निर्भीड,कार्य कर्तृत्वाच्या जोरावर अनेक पारितोषिक मिळवित अभूतपूर्व यश संपादन केले आहेत.म्हणूनच आदरणीय सराच्या मौलवान कार्यकर्तृत्वाचा गौरव झालेला दिसतो आहे.

          आ.प्रदीप सर,अगदी अनेक कामासाठी असलेली तुमची तगमग,जिद्द,चीकाटी,त्यामागचे उचीत व यथायोग्य समर्पण खरोखर प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.तुमच्याकडून मला खूप सार्‍या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत..! आणी तुमची निस्वार्थी प्रेरणा संकटाच्या वेळी मला शक्ती प्रदान करीत असते हेही तितकेच खरे आहे.

          बातमीतील अमर्याद शब्दरचना वाचकांना अगदीच काव्यसंग्रह वाटावी अशाच शब्द शैलीत असते.सराचे लिखाण म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारची शब्दसंपत्ती आहे.आपन खरच माझे आदर्श ठरावे असीच आपली कार्यपद्धत आहे.

              आ.प्रदिप रामटेके सर यांची जागतिक मानवाधिकार संघटना राज्यस्तरीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल प्रथमतः हार्दीक अभिनंदन…..

          पत्रकारिता करित असतांना त्यांच्या बातम्यांमुळे रामटेके सर अगदीच कुणालाही खटकतात,बोचतात,अनेकांच्या मनात खुपतात,त्यामुळेच त्यांचे विषयी काहीच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत.अनेकजण आजही सरांची बातमी शब्द न शब्द कॉपी करताना दिसतात. 

         अनेकानी प्रसंग साधून त्यांचा खच्चीकरण करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला आहे. पण ते डगमगले नाहीत तर अनवरत मार्गक्रमण करीत राहीले.आ.रामटेके सरांनी आपला मनोधैर्य खचु दिला नाही,याऊलट आपली प्रगत कार्यप्रणाली व कर्तबगार जबाबदारी सांभाळत अनेकांच्या ह्रदयात जागा मिळवली आहे.असा सोज्वळ व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करणारा अष्टपैलु संपादक म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही,अशीच सरांची विचारसरणी त्याच्या अभूतपूर्व संपादकीय अग्रेलेख लिखाणातुन दिसुन येतो आहे. 

          “एक व्यक्ती म्हणून नाही तर एक व्यक्तिमत्त्व म्हणून आयुष्य जगणारी व स्वतःची तत्वे असणारी आणि तत्वांशी प्रामाणिक असणारी माणसे या जगात कमीच असतात.”

         मुख्य संपादक रामटेके सर यांची एकंदरीत कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरावी असीच आहे.चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव सारख्या एका छोट्याश्या खेड्यात शेतकरी व सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही अनेक संकटावर मात करीत खंबीर नेतृत्व जोपासत पत्रकारिता क्षेत्रात रामटेके सर यांनी आपली छबी निर्माण केली आहे आणी आज दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक या पदावर कार्यरत राहुन महत्वाची जबाबदारी तत्परतेने पार पाडताना दिसून येत आहेत.

          त्यांच्या या समाजहितोपयोगी मौलिक कार्याला तद्वतच खंबीर नेतृत्वाला सलाम करुन भरभरुन शुभेच्छा प्रदान करतो आहे.

        प्रदिपजी रामटेके सर यांचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत,अगदीच विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही अगदी जिवलगपने मैत्रीचा हात पुढे करुन ऋणानुबंधाचे एकनिष्ठ नाते जोपासणारे,आपल्या सहकारी मित्रांविषयी मुख्य संपादक रामटेके सर यांच्या मनातील वैचारिक आपलेपणा,हृदयस्पर्शी स्नेहभाव अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. 

          आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मुख्य संपादक…! 

 

           काही माणसं स्वभावाने कशीही का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,अशा माणसांपैकीच एक म्हणजेच प्रदीपजी रामटेके सर!…

        आमचे प्रमुख मार्गदर्शक, प्रेरणास्थान दूरदृष्टी ठेवून कार्यप्रणालीचा अवलंब करून सारासार व समर्पक विचार लिखाणातुन मांडणारे उदयोन्मुख व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करनारे मुख्य संपादक सर यांचे आयुष्य असेच सदोदित फुलत राहो,त्यांची वाटचाल सुजलाम् सुफलाम् होवुन अविरत प्रफुल्लित होत राहो,त्यांची अनवरत भरभराट होवो.त्यांना असेच घवघवीत यश मिळत राहोत,अशी दखल न्युज भारतचे संपादकीय संचालक मंडळ तथा जागतीक मानवाधिकार संघटना विदर्भ कार्यकारणी व पदाधीकारी यांच्या कडुन पुढील वाटचालीसाठी मंगलमय मनोकामना…!