महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे :- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…  — स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आनंदसोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. पुढे ते म्हणाले, याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे असे गौरवोद्गार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे बोलताना केले.

        या कार्यक्रमाला स्वामी गोविंदगिरी महाराज, बाबा रामदेव, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, उमा खापरे आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला.

       योगी आदित्यनाथ म्हणाले “मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे.

          यावेळी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले तसेच आळंदीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी मंदिरातील सर्व माहिती योगी आदित्यनाथ यांना सांगितले.