रिपब्लिकन पक्ष कुणाला जागा मागत नाही,रिपाई हा स्वाभीमानाने जगणारा पक्ष आहे,रिपाईला विचारात घेतल नाही तर त्याच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही – रिपाई सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई.

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली – रिपब्लिकन पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पक्ष आहे.राज्यपाल रा. सु. गवईनी मरेपर्यत इमाने इतबारे चालवलेला पक्ष आहे. म्हणुन आमचा पक्ष कुणाला जागा द्या म्हणत नाही. 

         आम्हाला पदाची लालसा नाही. जो पक्ष आमच्या सोबत गद्दारी करेल त्या पक्षाचे वाटोळेच होईल.नुकत्याच पार पडलेल्या छत्तीसगड,मध्यप्रदेश निवडणुकीवरून लक्षात घ्यावे.अशीच परिस्थिती राहीली तर महाराष्ट्रात सुध्दा तेच होईल.याचा विचार त्या पक्षानी करावा,असा अप्रत्यक्ष टोमणा कांग्रेसचे नाव न घेता लगावला.

           संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही आणि अशी वेळ आलीच तर रिपाईला सोबत घेतलाशिवाय संविधानाचे बचाव होवू शकत नाही,तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम् रिपाईच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय महासचिव डॉ. शराजेंद्र गवई यांनी रिपाईच्या राष्ट्रीय अधिवेशना प्रसंगी केले.

          रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अधिवेशन डॉ.आंबेडकर सभागृह चंद्रपूर येथे रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय.

         कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी केले.

          कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे कोषाध्यक्ष रामराव दाभाडे,उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे,नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे,माजी जि.प.सदस्य अँड.राम मेश्राम,माजी कार्याध्यक्ष रामसिंह सोहेल,नागपूर प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन,रिपाईचे जेष्ठ नेते व्हि.डी. मेश्राम,रिपाईचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष लाजर कांबळे,यवतमाळ जिल्हाध्यक्ष रमेश जिवने,वर्धा जिल्हाध्यक्ष अँड. नरेंद्र पाटिल,भंडारा जिल्हाध्यक्ष वसंत हुमणे,बाजीराव उंदिरवाडे,माजी नगरसेवक एन.डी. पिंपळे,गुरुदास रामटेके,ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष विजय रामटेके,गडचिरोली जिल्ह्यातील पिरिपाचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

          अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपालराव रायपूरे हे होते.रिपाईचे चंद्रपूर जिल्ह्याचे महासचिव मोरेश्वर चंदनखेडे यांनी अधिवेशनाचे उत्तम नियोजन केले.

          याप्रसंगी सुबोध वाघमोडे म्हणाले की निवडुन येण्यासाठी कुणाची तरी साथ हवी व रिपाईच्या साथी शिवाय दुसरा कुणी निवडुन येत नाही. 

        गोपाल रायपूरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी माझे सतत प्रयत्न सुरु असुन प्रत्येक तालुक्यात सभा घेणार असुन बेरोजगारांना रोजगार,नोकर्‍या मिळाल्या पाहीजेत असेही रायपूरे यांनी सांगीतले.

           अँड.राम मेश्राम यांनी आत्ताचे भाजपाचे सरकार हे गोरगरीबांचे वाटोळे करणारे सरकार आहे.महागाई वाढतच आहे.बेरोजगारांना नोकऱ्या नाही.शेतकरी हवालदिन झालेला आहे.अश्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वाच्या एकजुटीची ताकद महत्वाची आहे असे सांगितले.

               नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे,रामराव दाभाडे यांचीही भाषणे झालीत.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाई चंद्रपूर जिल्हा महासचिव व कार्यक्रमाचे आयोजक मोरेश्वर चंदनखेडे यांनी केले तर संचालन अश्चिनी खोब्रागडे यांनी केले.आभार शिद्धार्थ सुमन यांनी मानले.

           कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्याचे अध्यक्ष व सचिव सहित बहुसंख्य रिपाई कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.