संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
नैसर्गिक शेती मिशन एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती स्वीकारता येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारेल, लागत कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा दबाव कमी होईल.
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी…
सेंद्रिय खतांचा वापर :- शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत वापरल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते.
पिकांची फेरपालट :- पिकांची फेरपालट केल्याने जमिनीत पोषक तत्वांची कमतरता होत नाही आणि सेंद्रिय कर्ब वाढतो.
मृदा संवर्धन पद्धती :- जमिनीची धूप आणि झीज कमी करण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. मार्गदर्शन करते वेळी ते बोलत होते.
तसेच कृषी अधिकारी घोगरे सर यांनी मिशन विषयी व शेती संबंधित योजनेविषयी सखोल माहिती कार्यक्रमाप्रसंगी दिली.
मौजा वळद येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान शेती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे सर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक युवा शेतकरी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अनिल किरणापुरे, भगीरथ सपाटे,डोंगरवार सर,मेश्राम मॅडम प्रगतशील महिला शेतकरी वंदना वैद्य, रजनीगंधा टेभुर्णी मॅडम,राधेश्यांची वैद्य, गोविंदराव हटकर, झासीराक शेंडे,नानू कापगते ,गिरधारी बडवाईक,गोपाल बनकर, झेड आर पटले, व गटातील सर्व महिला शेतकरी व समस्त गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंगरवार सर, प्रास्ताविक भगीरथ सपाटे सर आभार रजनीगंधा टेभुर्णी मॅडम यांनी केले.



