संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने डॉ.नारायण महाराज जाधव यांचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : वारकरी संप्रदायाचे आदर्शवत व्यक्तीमत्व हभप डॉ.नारायण महाराज जाधव यांना २०२३ चा महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराची सोमवारी (ता.१५) घोषणा केली.

          डॉ.जाधव यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या साधक वर्ग, अनुयायी व आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

              आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश काळे यांनी डॉ.नारायण महाराज जाधव यांचा सत्कार केला.

           यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, तुकाराम गवारी, श्रीधर घुंडरे पाटील, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, सोपानराव काळे, रामभाऊ गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.