भीषण अपघात,१२ प्रवाशांचा मृत्यू…

वृत्त संस्था..

       आसामच्या गोलाघाट जिल्हातंर्गत बुधवारी सकाळी प्रवासी बस आणि ट्रकच्या धडकेत पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक गंभीर घटना घडली आहे. 

           याचबरोबर २५ जण जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती देशभरात वाऱ्यासारखी वेगाने पसरली.ही घटना राष्ट्रीय महामार्ग 37 वरील डेरगाव येथे पहाटे 5 वाजता घडली.

         प्रवाशांनी भरलेली बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने जात होती.विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली.या अपघातात ट्रक आणि बस चालकांचा मृत्यू झाला.

        जखमींना डेरगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.याचबरोबर गंभीर जखमींना जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जेएमसीएच) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.